इंदापूर तालुक्यातील व्याहळी बैलगाडा शर्यतीत अपघात; ‘वीर’ उर्फ छोटा सोन्या (बैल) ठार, आयोजकांवर नाराजी

 


इंदापूर:प्रवीण नरुटे 


         व्याहळी (ताइंदापूरयेथील बैलगाडा शर्यतीमध्ये स्पर्धा चालू असताना अपघात होऊन शर्यतीतीलबैल ठार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहेतर ड्रायव्हर जखमी झाला आहेसतीश मासाळयांचा ‘वीरउर्फ छोटा सोन्या हा बैल या शर्यतीमध्ये दुर्दैवाने धावपट्टीशेजारी उभ्या असणार्‍या ट्रॅक्टरट्रॉलीला धडकून जागीच ठार झाल्याने संपूर्ण बैलगाडा शर्यतप्रेमींनी हळहळ व्यक्त केली आहेनियमांचीपायमल्ली करून ही शर्यत भरवली असल्याचा आरोप बैलगाडा शौकिनांनी केला आहे.


                     

या घटनेमुळे व्याहळी बैलगाडा स्पर्धेच्या आयोजनावर आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ‘वीरचे मालकसतीश मासाळ  बैलगाडा शर्यत चाहत्यांनी आयोजकांवर अत्यंत गंभीर आरोप केले आहेतया स्पर्धेच्याआयोजनामध्ये मोठ्या प्रमाणात ढिसाळ नियोजन हेच ‘वीर उर्फ छोटा सोन्या ‘चा बळी घेण्यासकारणीभूत ठरल्याचा आरोप त्यांनी केला आहेआयोजकांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी बैलगाडाशौकिनां कडून केली जात आहे.


                   नियमानुसार ज्या ठिकाणी स्पर्धेचे आयोजन केले जातेत्या ठिकाणची पाहणी संबंधित अधिकार्‍यांकडूनकेली जातेधावपट्टी आणि मैदान बैलांसाठी सुरक्षित असेलतरच शर्यतीला परवानगी दिली जातेयासाठी अधिकार्‍यांनी स्पर्धेच्या मैदानाला भेट देऊन त्या ठिकाणी सर्व सुरक्षा नियमांचे पालन केले गेलेआहे का नाहीहे पाहणे आवश्यक असतेतरच अशा स्पर्धांना परवानगी दिली जाते मात्र ही परवानगीकशी मिळाली याचाही खुलासा होणे गरजेचे आहे.


               बैलगाडा शर्यती चालू होण्यामागे मोठा संघर्ष आहेबैलगाडा शर्यत हे ग्रामीण संस्कृतीचा अविभाज्य भागम्हणून आणि बळीराजाच्या करमणुकीचे साधन म्हणून मोठ्या संघर्षाने या बैलगाडा शर्यतींना मान्यतामिळाली आहेपरंतुअशा प्रकारच्या आयोजकांच्या ढिसाळ नियोजनामुळे या बैलगाडा शर्यतींनागालबोट लागत आहेलाखमोलाचा बैल गमावण्याची वेळ बैलमालकांवर यामुळे येते.


सतीश मासाळ यांनी पोटच्या पोराप्रमाणे माया लावून लहानाचे मोठा केलेल्या ‘वीरला त्यांना निरोपद्यावा लागलाया वेळी ‘वीर उर्फ छोटा सोन्या’ या बैलाचे शेकडो चाहते उपस्थित होतेत्यांनी आपल्यालाडक्या ‘वीरला भावपूर्ण श्रद्धांजली वाहून अखेरचा निरोप दिलामासाळ कुटुंबातील सहा वर्षाच्याईश्वरी या मुलीला वीर उर्फ छोटा सोन्या याचा मृत्यूची बातमी समजल्यानंतर तिनं अन्न पाणी  घेता तीवीर उर्फ छोटा सोन्याच्या विरहात सतत हंबरडा फोडत आहे.


बैलगाडा शर्यतीचे शौकिनवीरचे मालक यांच्याकडून आणखी एका बाबीवर अत्यंत संताप व्यक्त केलाजातो आहेज्या वेळी वीरचा अपघात होऊन तो मरण पावला त्या वेळी सर्वजण आग्रह करीत होते कीस्पर्धा थांबवापरंतुआयोजकांनी याकडे दुर्लक्ष केले  स्पर्धा पुढे चालू ठेवलीसत्कार समारंभ चालूठेवलेमुक्या जनावरांनादेखील माणुसकीची वागणूक मिळायला हवीहेच आयोजक विसरलेअसे गंभीरआरोप आता अनेक प्रेक्षकांकडून देखील केले जात आहेत.


माझ्या वीरचा मृत्यू ही खूप दुर्दैवी गोष्ट असून यावर विश्वास बसत नाहीआयोजकांच्या ढिसाळनियोजनामुळेच वीरचा अपघात होऊन त्यात त्याचा मृत्यू झाला आहेमैदान भरत असताना मैदानाच्याचारही बाजूने किमान तीनशे मीटर पर्यंत कोणत्याही प्रकारचा अडथळा नसायला हवा त्याचबरोबरमैदाना शेजारी कोणत्याही प्रकारची वाहने उभी नसावी यामुळे अपघाताला आमंत्रण मिळतेयाचबरोबरसुरक्षेच्या दृष्टीने आयोजकांनी सुरक्षिततेच्या बाबतीत पूर्ण जबाबदारी घेतली जावी.

-सतीश मासाळ (बैलगाडा मालक काटी)

Post a Comment

0 Comments